शनिवार, ११ जानेवारी, २०१४

गडावरील पवित्र तीर्थ
1.कालीकुंड व सुर्यकुंड
पुर्वी सप्‍तश्रृंग गडावर 108 कुंडे असल्‍याचा उल्‍लेख आहे.सध्‍या प्रत्‍याक्षात 10 ते 15 कुंडे दिसतात. बाकीची कुंडे बुजली असावीत. गडावरून पुर्व दिशेने गेले की मारूतीचे मंदिर व थोडे पुढे गेले की दाजीबा महाराजांच्‍या समाधी लागते. दाजीबा महाराजांच्‍या समाधीपासुन जवळ्च सुर्यकुंड व कालीकुंड हे लागतात. ही दोन कुंडे पेशवेंचे सरदार छत्रसिंग ठोके यांनी बांधली. याच कुंडाचा पाण्‍याचा वापर श्री. भगवतीच्‍या दैनंदीन स्‍नानासाठी केला जातो.
2. जलगुंफा
या नावाने एक तिर्थ खाली कपारीत आहे. ते नैसर्गिक पर्वत पोखरणीत आहे. ती पोखरणी देवीच्‍या पायापासुन उगम पावली. असे म्‍हणतात ते‍थे भंयकर अंधार असल्‍यामुळे पाण्‍याचा किती थांग आहे हे सांगता येणार नाही. पोखरणीचे मुख पुर्वेकडे असल्‍यामुळे सकाळच्या सूयकिरणांनी अधुंक उजेड पडतो. तिर्थावरील पाणी बफासारखे थंड आहे. तसेच यात तीन डोळयांचा मासा असून त्याच्या स्पशाने लोखंडाचे सुवण होते असे सांगितले जाते. तसेस असेही सांगितले आहे की, या पर्वतावर आणखी एक विचित्र वृक्ष आहे. त्याची पाने काशाच्या स्पशाने मृतीकामय होतात. तिचे पाणी पाच प्रहरापर्यंत ठेऊन अग्नीचा स्पर्श केला म्हणजे त्याचे रोप बनते. जलगुंफेतील या तीर्थास मछतीर्थ असेही म्हणतात.
३. शिवतिर्थ
सप्‍तश्रृंग गडाच्या दक्षिणेस शिवालय नामक एक पुण्यकारक तिर्थ आहे. हेच ते गिरीजातिर्थ व शिवतीर्थ होय. पूर्वी याचे बांधकाम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले. परंतु त्याची पडझड झाल्याने ट्रस्टने त्याचा नुकताच जिर्णोध्दार केला असून तेथे स्नानाबरोबरच वस्त्रांतर गृहाची व्यवस्था केली आहे. या कुंडात स्नान केल्यास विविध तापापासून मुक्तता मिळते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. या तिर्थात सर्व देवांनी स्नान करुन जो कोणी पिंड श्राध्द करील तो पितरासहित जगदंबा स्वरुपास प्राप्त होईल. तिर्थाजवळ आणखी एक हेमाडपंथी सिध्देश्वर मंदिर आहे. जवळच एक मारोतीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच लाकडी खांबाची जागा आहे. येथे पूर्वी मल्लखांब होता. मल्लखांबाचे मुळ स्थान हेच आहे. मल्लविद्येचे गुरु बाळंभट दादा देवधर यांना श्री मारुती या विद्येचे येथे धडे दिले व येथूनच मल्लखांब विद्या पुढे सुरु झाल्याची उदाहरणे सापडतात.
४. तांबुलतिर्थ
सप्‍तश्रृंग देवीच्या मागील बाजूला थोडे उत्तरेकडे एक अष्टकोनी कुंड आहे. या पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीने पानाचा विडा खाउन या बाजूला टाकल्यामुळे पाणी व जमिनीचा काही भाग तांबडया रंगाचा झाला. त्यामुळे या तिर्थाला तांबूल तिर्थ असे म्हणतात. तसेच एक काजल तिर्थ आहे. याचे पाणी काळे आहे. देवीने काजळ घातलेले डोळे येथे धुतले म्हणूण यास काजळ तीर्थ असे म्हणतात. शिवालया तलावाच्या पश्चिमेस गंगा यमुना नावाची दोन कुंडे शेजारी-शेजारी आहेत. यमुना कुंडाचे पाणी काळेभोर व रुचकर आहे. या कुंडापासून थोडे दक्षिणेस गेल्यास पूर्वाभिमुख गणपती मंदिर आहे. पूर्वी वणी कडून गडावर येण्यासाठी याच दगडी पाय-यांच्या मार्गाने गडावर येऊन गणेश मंदिराजवळ विश्रांतीसाठी थांबत असत. येथे पण दगडाचा कोरीव कोरलेले पाण्याचे तळे असून त्याचा वापर पिण्यासाठी करीत असत.
५. मार्कंण्डेय दर्शन
सप्‍तश्रृंग परिसर अनेक पवित्र ठिकानांनी पवित्र झाला आहे. त्यात मार्कंण्डेय ऋषिंचा उल्लेख महत्वाचा ठरतो. सप्‍तश्रृंगीचे मुख पुर्वेकडे आहे. तेंव्हा समोरील मार्कंण्डेय डोंगर नजरेत भरतो. मार्कंण्डेय भृगृ वंशातील त्रेता युगात झाले. प्रारंभी ते अल्पायुशी होते, परंतु सप्तर्षींचे आशिर्वादाने दिर्घायु झाले. धर्मराज वनवासात असताना मार्कंण्डेय ऋषींनी त्याला अनेक वृतांत कथन केले. कल्पातीच्या वटवृक्षाचे व प्रलयाचे दर्शन मार्कंण्डेय ऋषींना झाले होते. वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यावर दिर्घायुष्य प्राप्तीसाठी जी शांती करतात तिच्यात प्रमुख देवता मार्कंण्डेय हीच असते. याच गडावर मार्कंण्डेय ऋषीं आसनस्थ होऊन देवीला तिच्या पराक्रमाचा कथा ऐकवत व देवी किंचित मान वाकडी करुन ऐकत असे. मार्कंण्डेय ऋषी चिरंजीव होऊन सर्व देवात श्रेष्ठ ठरले.
६. शितकडा
याला सतीचा कडा असेही म्हणतात. शिवालय तिर्थापासून थोडयाच अंतरावर शितकडा नावाची दरी आहे. ही दरी सुमारे १२०० फूट खोल असून हा कडा खूप ऊंच व सरळ आहे. या कडयाचा वापर बलिदानासाठी उपयोगी होईल. गडावर काही संकट आल्यास काही होऊ नये म्हणूण तेथे पशू बळी देण्याची पध्दत होती. याला भाग देणे असे म्हणत. तसेच देवीची कृपा व्हावी म्हणूण या कडयावरुन लोटून बळी दिला जाई. या कडयाबद्दल एक विचित्र अख्यायिका आहे. फार फार वर्षापूर्वी एका बाईने नवस केला होता की, तिला जर मुलगा झाला तर ती मुलासह सप्‍तश्रृंग गड चढून येणार होती व मुलासह दर्शन घेऊन देवीला नमस्कार करुन बैलगाडीतून शितकडा उतरणार होती. शितकडा म्हणजे कुठलीही वस्तू कडयावरुन खाली टाकली तर तिचे भाताच्या शिता सारखे तुकडे तुकडे होणे. देवी बाईच्या इच्छेप्रमाणे नवसाला पावली व बाईला मुलगा झाला. नवस फेडण्यासाठी ती बाई आपल्या मुलाला घेऊन गाडीत बसली. आपल्या नव-याला तिने गाडी शितकडयावरुन नेण्यास सांगून मी केलेला नवस फेडावयाचा आहे. असे सांगितले. तिचा नवरा तयार होईना. शेवटी त्या बाईचा घरगडी बैलगाडी चालविण्यास तयार झाला. सर्वांनी देवीची करुणा भाकली. घरगडी, बैलगाडी, बाई व मुलगा कडयावरुन सुखरुप खाली उतरले. हा भयास नवस देवीने बाईकडून फेडून घेतला. आजही शितकडयावर गाडीच्या चाकोर्या दिसतात. या कडयाच्या वरच्या बाजूस वा-याचा झोत मोठा असतो. सध्या येथे कडयाचा वरील भाग कुंपन घालून सुरक्षित केलेला आहे. हा कडा पवित्र समजून लोक दर्शन घेतात.
Share:

सप्तश्रृंगी गड एक तपोभूमी
श्री क्षेत्र सप्तश्रृंगी ग़ड स्थान महात्म्य
सप्तश्रृंगी गडावर अनंत कालापासून महामाया आदीशक्त्तीचे वास्तव्य आहे.तिच्या दर्शनासाठी व मनोवांछीत फलप्राप्तीसाठी
अनेक थोर तपस्वी , महामुनी , संत , महंत, आणि भक्त गडावर आल्याचे उल्लेख आढळतात.
प्रभु रामचंद्र वनवासात असतांना काही दिवस नाशिक पंचवटी येथे थांबले असताना सितामाई सोबत श्री. भगवतीच्या दर्शनास आल्याचा उल्लेख आढळतो.सप्तश्रृंग गड हा पुर्वी दंडकारण्याचा भाग होता. मार्कण्डेय ऋषी , पाराशर ऋषी ई. याच ठीकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख आढळतो. संत गाडगे महाराज ही समाज प्रबोधन करत करत गडावर थांबल्याचा उल्लेख आहे. देवीचे परमभक्त संत दाजीबा महाराज यांचेही गडावर वास्तव्य होते. त्यांचे शिष्य पट्टेकर महाराज हे सप्तश्रृंग देवीचे परमभक्त होते. त्यांच्याच प्रेरणेने देवस्थानाने दाजीबा महाराजांच्या समाधी मंदीराचा जिर्णोद्धार केला आहे.
ज्ञानेश्वरांची कुलस्वामिनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामधील एका ओवीत संत ज्ञानेश्वरांचे पिताजी विठ्ठलपंत सप्तश्रृंग गडावर आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.तिथे भट्टाचर्यांवर हल्ला करुन बेजार करुन टाकले.संत निवृत्तीनाथांच्या भजन मालिकेत पहिल्या सात अभंगात संत नामदेवांनी सधु संतांच्या नात्या गोत्यांचे वर्णन केले आहे.संत निवृत्तीनाथ पांडुरंगाची आळवणी करताना म्हणतात
आता खरे चला तुम्ही सप्तश्रृंगा|
कार्य पांडुरंगा कार्य सिद्धीस न्यावे ॥
सप्तश्रृंग माता ही निवृत्तीनाथा कुलस्वामिनी,संत ज्ञानेश्वर नामदेव व मुक्ताबाई या लहान भावंडांनी त्या पुर्वीच समाधी घेतली होती. सहाजिकच निवृत्तीनाथांना समाधी घेण्याची घाई झाली म्हणुन तीन दिवस गडावर येउन ध्यानस्त बसले. शिव अवतारी हा संत भगवतिची परवानगी घेण्यासाठी गडावर आला होता. निवृत्तीनाथांची हाक ऐकुन पांडुरंग गरुडावर आरुढ होउन गडावर आले होते.याचा उल्लेख ही शके बाराशे बारोत्तरीत आहे.या योगिनीची परवानगी घेउन संत निवृत्तीनाथ शेवटी त्र्यंबकेश्वरी जाउन समाधीस्त झाले.
Share:

गडावर जाण्याचा मार्ग
नाशिकच्या उत्तसेस ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पुर्व पश्चिम रांगेत डोंगर पठारावर समुद्र सपाटीपासून ४६०० फुट उंचीवर हे ठिकाण आहे. येथील निसर्ग सौंदर्य व भक्तीने भारावलेले वातावरण भाविक व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करेत. सप्‍तश्रृंग गडाच्या पुर्वेला असलेल्या मर्केंण्डेय डोंगर गडाच्या दक्षिणेला असलेले गणेश मंदिर व सतीचा कडा आजूबाजूची बारमाही पाण्याने तुडूंब भरलेली धरणे हे ही परिसराचे आकर्षण होय.
 


या ठिकाणी भाविकांना येण्यासाठी नाशिक येथून सप्‍तश्रृंग गडावर येता येते. गुजरात राज्यातून भाविक सातपुरा कनाशी, अभोणा मार्गे सप्‍तश्रृंग गडावर येतात.
सप्‍तश्रृंग गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहेत. येथून ५०० पाय-या चढून वर गेल्यावर डोंगराच्या कपारीत ८ फूट उंचीची शेंदूरचर्चित रक्तवर्णीय अशी महामाय स्वयंभू सप्‍तश्रृंग मातेचे दर्शन घडते. जगदंबेचे दर्शन झाल्याबरोबर मन प्रसन्न होते. भक्तांचा थकवा नाहीसा होतो. श्री भगवतीचे १८ हात असून तिला अष्टभुजा असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तिने वेगवेगळे आयुधे धारण केलेली आहेत. श्री भगवतीचे मूर्ती ८ फूट उंचीची असल्याने तिला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळयात मंगळसुत्र व पुतळयाचे गाठले, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार अंगावर घालण्यात येतात.
Share:

श्री क्षेत्र सप्तश्रृंगी ग़ड स्थान महात्म्य
प्राचीन काळापासुन मांनव शक्तिची उपासना करीत आहे. मानवी जिवनात शक्ति उपासनेला विशेष महत्तव आहे. श्री जगदंबेची ५१ पिठे भुतलावर असुन उपासकांना त्यापासुन लाभ झाला आहे. 
या शक्तीपिठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्ह स्वरुपीणी धर्मपीठ ओंकार स्वरुप आधिष्ठीत आहे. आणि तेच म्हणज़े सप्तश्रृंग गडावरील श्री. सप्तश्रृंगी देवी होय. दुष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सप्तश्रृंगीचे पुराण काळापासुन असलेले महातम्य लक्षात घेता या देवीची स्वयंभु अशी मुर्ती असुन नवनाथ सांप्रदायातुन नाथापासुनचा कालावाधी स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्र शक्ती ही देवी सप्तश्रृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तरोत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर , पेशवे सरकार, दाभाडे, विंचुरकर, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पिठाशी अगदी जवळचा संबंध होता असे दिसुन येते.
पुर्ण पिठ सप्तश्रृंगी गड
पुर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलवता सर्व देवांना बोलवले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसतांना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही. त्यामूळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळाल्यानंतर त्याने यज्ञात विध्वंस केला. सतीचे कलेवर हातावर घेउन श्री. शंकर त्रेलोक्यात हिंडु लागले. ही स्थिती पाहून विष्णुने सुदर्शन चक्र सोडले व सतिच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पडले. हिच ५१ शक्तीपीठे म्हणुन गणली जाउ लागली.
महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, तुळजापुरची महासरस्वती, माहुरची महाकाली आणि वणी ची सप्तश्रृंगी देवी आहे. परंतु आदी शक्तीचे मुळ स्थान सप्तश्रृंग गड हेच होय. ओकारातील मकार पुर्ण रुप होऊन सप्तश्रृंग गडावर स्थिरावला म्हणुन हेच मुळ रुप आणि हिच आदिमाया. अठरा हातांची ही महिषासुर मर्दिनी श्री. महालक्ष्मी देवी, श्री. महाकाली व श्री. महासरस्वती होय. या त्रियुगणात्म्क स्वरुपात आद्यस्वयंभु शक्तीपीठ म्हमणुण श्री. सप्तश्रृंग देवीचा उल्लेख पोरणिक ग्रंथातुन आढळतो.

Share:

|| आईसाहेब ||
 
सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोsस्तु ते ॥ 
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोsस्तु ते ॥ 
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते । भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोsस्तु ते ॥ 
भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोsस्तु ते ॥
Share:

सप्तशृंगी देवी

सप्तशृंगी देवी
साडेतीन पीठांपैकी एक दैवत.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापुरात (करवीर) आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहूरची महाकाली व वणीची सप्तशृंगी देवी. हिच्या दर्शना साठी देशभरातुन भाविक येतात. सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम रांगेत समुद्र सपाटी पासून ४६०० फूट उंची पर्यंतच्या डोंगरपठारावरील साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगीदेवी. १८ हातांच्या या महिषासुर मर्दिनीच्या दर्शना साठी देशभरातुन भाविक येतात.
सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.[१]
Share:

गुरुवार, ९ जानेवारी, २०१४